सूरज दाहाट : अमरावती | रवी राणा व बच्चू कडू वाद हा शिगेला पोहचला असतांना आज या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र आता बच्चू कडू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
मी मुंबई ला संध्याकाळी आठ वाजता निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली, दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही मात्र कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.