ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर भारती पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा पार पडली.

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा पार पडली. या सभेच्यावेळी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना एका तरुणाने कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी केली. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सभास्थळावरुन बाहेर नेलं. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

यावर आता भाजप नेत्या भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारती पवार म्हणाल्या की, संबंधित व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाची आहे, कुठल्या पदावर आहे. आणि जर असं आहे तर ही लोकशाही आहे. तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढली पाहिजे. आम्ही जशी भूमिका आमच्या स्टेजवर मांडतो आहे. आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही प्रामाणिकपणे जनतेसमोर ठेवतोय.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, तुम्ही मात्र ही पातळी कुठेतरी घसरवण्याचे काल निदर्शनास आलं. विरोधकांना आत्मविश्वास राहिलेला नाही आहे. विरोधकांनी अशाप्रकारचे गलिच्छ राजकारण केलं आहे. की त्यांच्याच पदावर असलेलं लोक जर अशाप्रकारचे प्रश्न विचारत असतील तर त्यांनी त्यांच्या स्टेजचा पण वापर करावा ना. असे भारती पवार म्हणाल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा