ताज्या बातम्या

Konkan Railway Megablock: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; कोकण रेल्वेवर आज ‘ब्लॉक’

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेवरील वीर-अंजणी स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी आणि देखभाल-दुरुस्तीसाठी मंगळवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात आला आहे.

Published by : Team Lokshahi

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेवरील वीर-अंजणी स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी आणि देखभाल-दुरुस्तीसाठी मंगळवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात आला आहे. दुपारी 1:10 ते 3:40 असा अडीज तासांचा ‘मेगा ब्लॉक’ असेल. या यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे. दुपारी 1:10 ते 3:40 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मंगळवारी गाडी क्रमांक 16345 एलटीटीवरून सुटणारी तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस कोलाड-वीर विभागादरम्यान 40 मिनिटे थांबवण्यात येईल. तसेच गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी रोडवरून सुटणारी दिवा एक्स्प्रेस रत्नागिरी-चिपळूण विभागादरम्यान एक तास थांबवण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. सोमवारी सुटणारी गाडी क्रमांक 02197 कोईम्बतूर जं. जबलपूर एक्सप्रेस मंगळवारी रत्नागिरी-चिपळूण विभागादरम्यान 45 मिनिटांसाठी थांबवण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

दरम्यान, कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल 3 गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर वेळापत्रक लागू झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष