ताज्या बातम्या

Ashish Shelar : भाजपने मोठा बॉम्ब फोडलाच! ‘व्होट जिहाद’ म्हणत आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज एक पत्रकार परिषद घेत आशिष शेलार यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले.

Published by : Prachi Nate

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज एक पत्रकार परिषद घेत आशिष शेलार यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. पक्षाचे प्रवक्ते यांनी या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विकास आघाडी (मविआ) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यावर “दुबार मतदारांचा” प्रश्न राजकीय फायद्यासाठी उचलल्याचा आरोप करत अनेक पुरावे समोर ठेवले.

प्रवक्त्यांनी म्हटलं की, “गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र विकास आघाडी आणि उद्धव ठाकरे-राज ठाकरे या दोघांनी मिळून निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कधी मतदान यंत्रांवर, कधी यादीवर, कधी निवडणूक आयोगावर अशा पद्धतीने नियोजित खोटं कथानक तयार केलं जात आहे.” भाजपने स्पष्ट केलं की, त्यांच्या भूमिकेनुसार “सर्वांसाठी न्याय, पण तुष्टीकरणाविरोधात भूमिका” कायम राहील.

भाजपने आरोप केला की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मतदारांमध्ये जाती-धर्माच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवक्त्यांनी राज ठाकरे यांच्या अलीकडील भाषणातील विधान उद्धृत करत विचारलं, “राज ठाकरेजी, तुम्हाला दुबार मतदार केवळ हिंदी किंवा दलित माणूसच दिसतोय का? मराठी मतदारांबद्दलही हीच भूमिका आहे का?” त्यांनी आणखी पुढे म्हटलं की, “तुम्ही निवडणूक शुद्ध व्हावी म्हणता, हे आम्हालाही मान्य आहे. पण दुबार मतदाराचा मुद्दा मांडताना हेतू शुद्ध असला पाहिजे.”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा