ताज्या बातम्या

Bail Pola Festival : राज्यात बैलपोळ्याचा उत्सव साजरा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

वर्षभर कठोर परिश्रम करणाऱ्या या प्राण्यांचा सन्मान करण्यासाठी श्रावण अमावास्येला ‘बैलपोळा’ हा सण साजरा केला जातो. आज राज्यभर या सणाचा उत्साह अनुभवायला मिळत आहे.

Published by : Prachi Nate

महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत शेतकरी आणि बैल यांचं अतूट नातं आहे. शेतातले काम, वाहतूक, नांगरणी, राब-राब, सगळी शेतीची मजुरी ही बैलांच्या श्रमांवरच उभी आहे. म्हणूनच बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती आणि कुटुंबातील सदस्य मानला जातो. वर्षभर कठोर परिश्रम करणाऱ्या या प्राण्यांचा सन्मान करण्यासाठी श्रावण अमावास्येला ‘बैलपोळा’ हा सण साजरा केला जातो. आज राज्यभर या सणाचा उत्साह अनुभवायला मिळत आहे.

बैलपोळा म्हणजे शेतकऱ्याच्या हृदयातील कृतज्ञतेचा सण. श्रावण हा पावसाळ्याचा महिना. या काळात शेतं हिरवीगार होतात, पीक लहरू लागतं आणि शेतकरी समृद्धीची आशा बाळगतो. या समृद्धीच्या स्वप्नामागे बैलांचा मेहनतीचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे शेतकरी या दिवशी बैलांची विशेष पूजा करून त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवतो.

बैलपोळ्याच्या दिवशी सकाळीच बैलांना स्नान घातलं जातं. त्यानंतर त्यांच्या अंगाला सुगंधी तेल, हळद-कुंकू लावलं जातं. शिंगांना रंगीत पेंट, डागडुजी करून त्यांना आकर्षक बनवलं जातं. गळ्यात घुंगरं, माळा, रंगीत कपडे, फडं, मोरपिसं लावून बैलांना शोभिवंत केलं जातं. त्यांच्या कपाळावर टिळा लावून शेतकरी आरती करतात.

शेतकरी आपल्या बैलांना गोडधोड खाऊ घालतो. पुरणपोळी, खीर, लाडू यासारख्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी गावोगावी बैलांच्या मिरवणुका काढल्या जातात. पारंपरिक गाणी, लेझीम, ढोल-ताशांचा गजर यामुळे हा उत्सव आणखी रंगतदार होतो.

ग्रामीण भागात बैलपोळा हा केवळ धार्मिक विधी नसून लोकजीवनाला एकत्र आणणारा उत्सव आहे. या दिवशी शेतकरी आपला दैनंदिन कष्टाचा विसर टाकून बैलांसोबत साजरा होतो. महिलाही यात उत्साहाने सहभागी होतात. घराघरांत बैलांसाठी खास पदार्थ बनवले जातात. लहान मुलं बैलांच्या सजावटीकडे आकर्षित होतात.

आजच्या आधुनिक युगात ट्रॅक्टर आणि यंत्रांची शेतीत मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला असला तरी ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अजूनही बैलाशिवाय शेतीची कल्पना अपुरी आहे. बैलांची ताकद, शिस्त आणि मेहनत शेतीत फार उपयुक्त ठरते. म्हणूनच शेतकरी आपल्या या साथीदाराला कधीही विसरत नाही. बैलपोळा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

बैलपोळ्यामुळे गावोगावी एकोपा, आनंद आणि आपुलकीचं वातावरण निर्माण होतं. एकत्र पूजा, मिरवणुका आणि सामूहिक कार्यक्रमांतून समाजातील ऐक्य अधिक दृढ होतं. हा सण ग्रामीण जीवनाला फक्त धार्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक बंधनं अधिक घट्ट करून जातो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा