chandrashekhar Bawankule  Team Lokshahi
ताज्या बातम्या

राहुल गांधींनी आधी माफी मागावी, मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवावं; चंद्रशेखर बावनकुळे

राहुल गांधी लवकरच मातोश्री वर येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राहुल गांधी लवकरच मातोश्री वर येणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सावरकरांची राहुल गांधींनी अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केलाय. राहुल गांधी यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. तरीही त्यांनी अपमान केला.राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट जरी कोणाचा डॅमेज कंट्रोल असेल, तर आम्हाला त्याबद्दल काही बोलायचे नाही. महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा. असे बावनकुळे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा