महिला बचत गटाची उत्पादने खुप चांगली असतात. पण या बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी उपाययोजना करणं खूप महत्त्वाचे आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभिनयाच्या अंतर्गत मॉल उभारणार आहे. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. त्यामुळे आधी 10 जिल्ह्यांमध्ये मॉल उभारणार आहे". महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील बचत गटांसाठी एक निर्णय घेण्याचा विचार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बचत गटांना आपल्या उत्पादनाच्या विक्रसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 'उमेद मॉल' उभारणार असल्याचे सांगितले. याविषयी आता सध्या प्रयोगिक तत्त्वावर राज्यातील 10 'उमेद मॉल' उभारले जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा, मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले की, "महालक्ष्मी सरस' हा उपक्रम गेली 21 वर्ष अविरतपणे कार्य करत आहे. उमेद अभियानाची प्रगती मी स्वतः बघितली आहे. उमेदच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
महिला बचत गटाची उत्पादने खुप चांगली असतात. पण या बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी उपाययोजना करणं खूप महत्त्वाचे आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभिनयाच्या अंतर्गत मॉल उभारणार आहे. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. त्यामुळे आधी 10 जिल्ह्यांमध्ये मॉल उभारणार आहे".
पुढे फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान मोदी यांनी लखपती दीदी ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामध्ये एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा आमचा निर्धार आहे". यादरम्यान ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, उमेदचे मुख्य परिचलन अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह राज्यभरातून बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.