ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या वज्रमुठ सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Published by : Siddhi Naringrekar

वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील बीकेसी मैदानावर ही सभा पार पडली. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोक म्हणतात मुंबई तोडणार, मुंबई तोडणार. कोण मुंबई तोडणार आहे? कुणीच मुंबई तोडण्याची हिंमत करू शकत नाही. ही हिंमत करताही येणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला आरोप-प्रत्यारोप, खालच्या दर्जाची भाषा आवडत नाही. त्यामुळे ही पोटदुखी सुरू झाली आहे. ही पोटदुखी वाढणार आहे म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखानाही तयार करून ठेवला आहे. त्यांनी तिकडे जाऊन मोफत औषध घ्यावं. असे शिंदे म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, शेवटी आमदार असो की मुख्यमंत्री, कुणाला बसवायचं आणि कुणाला उतरवायचं हे सर्व जनता जनार्दनाच्या हातात असतं. खरी एकजूट आणि विकासाची वज्रमुठ इथं पाहायला मिळत आहे. असे शिंदे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप