Eknath Shinde
Eknath Shinde 
ताज्या बातम्या

"स्वप्नातही राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत", इंडिया आघाडीवर CM एकनाथ शिंदेंनी डागली तोफ

Published by : Naresh Shende

Eknath Shinde On Rahul Gandhi : स्वप्नात जरी विचार केला, तरी राहुल गांधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही. या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त नरेंद्र मोदींना आहे. कारण त्यांनी आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलं आहे. मोदींनी देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. दूध पिणारा मुलगाही म्हणेल, अबकी बार ४०० पार आणि फिर एक बार मोदी सरकार. म्हणून नो लंके, ओन्ली विखे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी उमेदवारांवर चिमटा काढतानाच राहुल गांधीवरही सडकून टीका केली. ते महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या अहमदनगरच्या प्रचारसभेत बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले, इंडिया आघाडीच्या इंजिनमध्ये एकच माणूस बसतो. पण मोदींच्या इंजिनमध्ये अनेक डब्बे आहेत. सुजयलाही या डब्ब्यात बसवून दिल्लीला पाठवायचं आहे. गेल्या पन्नास वर्षात राहुल गांधींचं लॉन्चिंग झालं नाही. मोदींनीं तर इस्त्रोच्या माध्यमातून चांद्रयानचं चंद्रावर यशस्वी लॉन्चिंग केलं. राहुल गांधी देश कसा पुढे नेणार, राहुलला गरमी झाली की, थंड हवा खायला विदेशात जातो. मग उन्हात २४ तास काम करणारे प्रधानमंत्री मोदी पाहिजेत का थंड हवा खायला विदेशात जाणारे राहुल गांधी पाहिजेत, हे ठरवा. ड्रामा करुन लोक निवडून येत नाहीत. त्यासाठी काम करावं लागतं. लोकांच्या दुख:त सहभागी व्हावं लागतं. येत्या १३ मे ला मतदान आहे. सुजयच्या मतदानात आपण सर्वांनी सुजयचा मागचा लीड तोडून पुढं जायचं आहे.

कडाक्याच्या उन्हात आपण इतक्या मोठ्या संख्येत सुजय विखे पाटील यांच्या पाठिशी उभे राहिलात, याचा अर्थ सुजयचा विजय पक्का आहे. सुजय विखे एक तरुण युवानेता म्हणून काम करत आहे. लोकसभेतही अनेक प्रश्नांना त्याने वाचा फोडली आहे. सुजयचे पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी याचा वटवृक्ष केला. आता ती परंपरा सुजय पुढे नेत आहे. सुजयच्या नावातच जय आहे, त्यामुळे त्याचा पराजय होणे अशक्य आहे.

विरोधकांच्या लंकेचं दहन करून सुजयला प्रचंड मताधिक्क्याने विजयी करायचं आहे. रावणरुपी लंकेचं दहन हनुमानजीने केलं. उद्या हनुमान जयंती आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या लंकेचं दहन करण्याचा संकल्प करा. मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे. सर्व गॅरंटी फेल झाल्या आहेत. एकच गॅरंटी चालली आहे, ती म्हणजे मोदी गॅरंटी. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची गॅरंटी आपण देशवासीयांनी घेतली आहे, असंही शिंदे म्हणाले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...