ताज्या बातम्या

Barsu Refinery प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन

कोकणातील राजापूर सोलगाव रिफायनरी प्रकल्पावरून वाद सुरु आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कोकणातील राजापूर सोलगाव रिफायनरी प्रकल्पावरून वाद सुरु आहे. कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी आता समितीची स्थापना करण्यात येत आहे. या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात स्थानिकांची जोरदार निदर्शने सुरू आहेत. स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पाला कडाडून विरोध आहे.

याच पार्श्वभूमीवर . कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी आता समितीची स्थापना करण्यात आली आहे. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात सोमवारी याबद्दल निर्णय झाला.

सौदी अरेबिया भारतात 8.20 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. कोकणातील निसर्गाला, जैवविविधतेला, पर्यावरणाला या प्रकल्पानं बाधा होईल. या भितीने ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प रद्द केल्याच्या अधिसूचनेनंतर आता बारसूतील सोलगाव परिसरात ती 'क्रूड ऑइल रिफायनिंग' कंपनी प्रस्तावित आहे. यावेळी मोदी म्हणाले की, रत्नागिरी प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

A. T. Patil Jalgaon : 'माझ्याशी दुश्मनी घेऊ नको, तुला...', माजी खासदार ए.टी. पाटलांची कोणाला धमकी?

Ajit Pawar On Asia Cup 2025 IND vs PAK : "मॅच पाहणं शक्य होणार नाही, कारण..." भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर अजित पवारांच वक्तव्य

Asia Cup 2025 IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याच्या बहिष्कारामुळे खेळाडूंमध्ये चिंता! भारतीय खेळाडूंना गाैतम गंभीरने दिला धीर

Asia Cup 2025 IND vs PAK : "...त्यामुळे सामन्याला नकार देणं" भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर BCCI ने काय म्हटलं