ताज्या बातम्या

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 'या' कारणामुळे तीन दिवस स्थगित

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा तीन दिवस पुढे स्थगित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेस कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी दिली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा तीन दिवस पुढे स्थगित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेस कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

दिवाळीनिमित्त राहुल गांधी दिल्लीला गेले आहेत. तर, बहुतांश सदस्य देखील दिवाळीसाठी घरी गेले आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंत यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय राहुल गांधी 26 ऑक्टोबर रोजी कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पदग्रहणनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रा २६ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. व 27 ऑक्टोबर रोजी सर्व पदयात्री पुन्हा भारत जोडो यात्रेत सहभागी होतील.

दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून तामिळनाडूमधील कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत असणार आहे. नुकताच या यात्रेचा 1000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. यादरम्यान राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत कर्नाटकातील मंड्या येथील या यात्रेत सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्याचे महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आज विशेष ब्लॉक, 'या' वेळेत राहणार वाहतूक बंद?

New Delhi : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन

Amol Mitkari : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते...; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती, अमोल मिटकरींचा दमानियांना टोला