Nana Patole On BJP 
ताज्या बातम्या

नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, "२०१४ आणि २०१९ मध्ये..."

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Naresh Shende

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, लोकसभा निवडणूक देशाच्या लोकशाही आणि संविधानासाठी महत्त्वाची आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये जे झालं, ते आम्ही बदलणार आहोत. भाजपच्या गॅरंटीवर विश्वास नाही. राहुल गांधींच्या गॅरंटीवर विश्वास आहे. आम्ही शेतकऱ्यांना बिनशर्त कर्जमाफी केली. महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही पैसे कुठून आणणार? असं भाजप विचारतात. आमचं सरकार आल्यावर आम्ही कर रद्द करु. जनतेचा इंडिया आघाडीवर विश्वास वाढला आहे.

इंडिया आघाडीचे पहिल्या टप्प्यातील पाच उमेदवार जिंकतील. संजय निरुपम यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून आम्ही नाव काढलं आहे. निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. काही ठिकाणी शरद पवार यांच्याकडे उमेदवार नाहीयत. आम्ही मेरिटवर निवडणूक लढणार आहोत. भाजप आता हद्दपार होणार आहे. कोणाला किती जागा मिळणार, हा आमचा उद्देश नाही. तर निवडणुकीत जास्त जागा कशा जिंकता येतील, यावर आम्ही लक्ष देत आहोत, असंही नाना पटोले म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat Special Report : सामाजिक न्याय विभाग पुन्हा वादात, टेंडर प्रक्रियेत नियमांची पायमल्ली?

Latest Marathi News Update live : 'ज्यांना सगळं काही दिलं ते गद्दार झाले'; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Tesla's First Showroom In BKC : भारतात टेस्लाची एंट्री; मुंबईतील बीकेसी येथे सुरू होणार पहिलं शोरूम

Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की....