Admin
ताज्या बातम्या

Har Ghar Tiranga: तिरंग्याच्या मागणीत दहापटीने वाढ

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर तिरंग्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमधील बाजारात ही मागणी तर तब्बल दहा पटीने वाढली आहे.

Published by : Team Lokshahi

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर तिरंग्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमधील बाजारात ही मागणी तर तब्बल दहा पटीने वाढली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशवासियांना ‘मन की बात’ च्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दिल्लीमधील सदर बाजारात लोकांची तिरंगा खरेदीसाठी झुंबड उडत आहे. “तिरंग्याची मागणी दहापटीने वाढली आहे. इतर छपाईची कामं कऱणारेही इतर कामं सोडून फक्त तिरंग्याची छपाई करत आहेत,” अशी माहिती दुकानदाराने एएनआयशी बोलताना दिली आहे.

यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल. या अभियानाच्या अंमलबजावणीत राज्य हे देशात अव्वल राहील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय