ताज्या बातम्या

मनोज जरांगे यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Published by : shweta walge

मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला जात असून त्यामागेही देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील केला आहे. यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर देऊन बोलणे टाळले.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सातारा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त फडणवीस साताऱ्यात आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. मी काही ऐकलंच नाही, मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, तर काय बोलणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस जरांगेंच्या आरोपावर काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी काही ऐकलंच नाही, मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, तर काय बोलणार असं म्हणत अधिक भाष्य करणं टाळलं. साताऱ्यातील कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस या विषयावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल.

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा