ताज्या बातम्या

Dilip Walse Patil : नागरिकांनी सजग राहून मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, भारतासारख्या मोठ्या देशामध्ये सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीकोनातून राज्य घटनेनं आपल्याला जो सामान्य माणसाला अधिकार दिलेला आहे. तो मतदानाचा अधिकार. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून हा अधिकार बजावला पाहिजे.

आपल्या आवडीचे आणि देशाचं हित करणारे सरकार हे देशामध्ये किंवा राज्यामध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे. याच्यासाठी मी आवाहान करतो की, सर्व नागरिकांनी भरभरुन मतदान करावं. असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा