IndiGo Crisis  IndiGo Crisis
ताज्या बातम्या

IndiGo Crisis : हवाई प्रवासात अडथळे, पश्चिम रेल्वेने अतिरिक्त डबे व विशेष गाड्या सुरू; जाणून घ्या वेळापत्रक

रेल्वे जनसंपर्क अधिकारी अजय सोलंकी यांनी सांगितले की, प्रवाशांना सुविधा देण्यासाठी, पश्चिम रेल्वे नियमित गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडत आहे.

Published by : Riddhi Vanne

(IndiGo Crisis ) रेल्वे जनसंपर्क अधिकारी अजय सोलंकी यांनी सांगितले की, प्रवाशांना सुविधा देण्यासाठी, पश्चिम रेल्वे नियमित गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडत आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रवाशांना या सेवांचा फायदा घेण्यासाठी आणि ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर वेळेत पोहोचण्याचे आवाहन केले आहे.

अजय सोलंकी यांनी सांगितले की, "प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी, पश्चिम रेल्वेने काही विशेष गाड्या सुरू केली आहेत. साबरमती-दिल्ली विशेष ट्रेन 7 आणि 9 डिसेंबर रोजी रात्री 10.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3.15 वाजता दिल्ली पोहोचेल. साबरमती-दिल्ली सराई रोहिल्ला ट्रेन 7 डिसेंबर रोजी सकाळी 5.30 वाजता सुटेल आणि रात्री ११ वाजता दिल्ली पोहोचेल. प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ घेण्यासाठी, त्यांना रेल्वे स्थानकावर अर्धा तास आधी पोहोचण्याची सुचना केली आहे." त्यांनी सांगितले की, नियमित गाड्यांमध्येही अतिरिक्त डबे जोडले जातील. उदाहरणार्थ, अहमदाबाद-थावे जंक्शन एक्सप्रेसमध्ये एक एसी ३-टायर कोच जोडला जाईल; सुवर्ण जयंती राजधानी एक्सप्रेसमध्ये दुसरा वर्ग एसी कोच जोडला जाईल आणि साबरमती-जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये एक स्लीपर कोच जोडला जाईल.

गेल्या आठवड्यात, भारतातील हवाई प्रवासी उद्योगाला मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. अनेक उड्डाणे रद्द झाली, उड्डाणांचे वेळापत्रक बदलले आणि इंडिगोने अनेक फ्लाइट्स स्थगित केल्या. याचे कारण म्हणजे डीजीसीएने लागू केलेल्या सुधारित फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) नियमांचा प्रभाव, ज्यामुळे अचानक वैमानिक आणि कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली. या परिस्थितीमुळे हजारो प्रवाशांना प्रतिकूल परिस्थितींना तोंड द्यावे लागले. लांब रांगा, अपुऱ्या सुविधा आणि काही प्रवासी तासन्तास विमानतळावर अडकले होते. प्रवाशांनी एअरलाइनला वेळेत माहिती देऊन तसंच प्रवासातील गैरसोय कमी करण्याची विनंती केली आहे.

शनिवारी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, इंडिगोने विविध प्रमुख विमानतळांवर मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली आहेत. हैदराबाद विमानतळावर 26 आगमन आणि 43 निर्गमनांसह 69 रद्द उड्डाणांची नोंद झाली. दिल्ली विमानतळावर 86 इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामध्ये 37 निर्गमन आणि 49 आगमन रद्द केले गेले. अहमदाबाद आणि कोलकाता विमानतळावरही रद्द उड्डाणांची नोंद झाली आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने इंडिगोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना कारणे दाखवण्याचा नोटीस पाठवला आहे. एअरलाइनच्या ऑपरेशनल व्यत्ययांसाठी जबाबदार धरून, त्यांचे नियोजन आणि संसाधन व्यवस्थापनातील त्रुटी यावर त्यांनी लक्ष वेधले आहे. या सर्व व्यत्ययांसाठी इंडिगोने माफी मागितली आहे. कंपनीने सांगितले की, त्यांनी 113 ठिकाणांना जोडणाऱ्या ७०० पेक्षा कमी उड्डाणांची व्यवस्था केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा