ताज्या बातम्या

औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शिवभक्तांची भावना

जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये.

Published by : Team Lokshahi

सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. जरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे.यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवभक्तांच्या भावनांचा आदर करतो. औरंगजेबाने संभाजी महाराजांनी महाराजांचा खूप छळ केला. औरंगजेबाच्या क्रौर्याची परिसीमा गाठली होती. आशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात कशाला? जी भावना शिवभक्तांची आहे तीच भावना माझी आहे".

तसेच नंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, "जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये. क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. तो महाराष्ट्राचा दुश्मन होता, देशद्रोही, राष्ट्रद्रोही होता, अशा या औरंग्याच्या खाणाखुणा महाराष्ट्रात कशाला पाहिजे. जे उदात्तीकरण करतात त्यांचा निषेध केला पाहिजे".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anil Parab : "गृहमंत्रीच कायदा सुव्यवस्थेचे भक्षक" अनिल परब यांचा घणाघात

Mahadevi elephant : महादेवी हत्तीणीच्या पुढच्या पायाला फ्रॅक्चर; वनतारा पशुवैद्यकीय तज्ञांची माहिती

Lionel Messi In India : फुटबॉलचा सम्राट आता क्रिकेटच्या मैदानात उतरणार! वानखेडेवर विराट-सचिनसोबत पाहायला मिळणार थरारक सामने

Dahi Handi 2025 : आता उत्सव होणार अधिक सुरक्षित! अपघात झाल्यास गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; रक्कम जाणून घ्या