ताज्या बातम्या

औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शिवभक्तांची भावना

जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये.

Published by : Team Lokshahi

सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. जरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे.यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवभक्तांच्या भावनांचा आदर करतो. औरंगजेबाने संभाजी महाराजांनी महाराजांचा खूप छळ केला. औरंगजेबाच्या क्रौर्याची परिसीमा गाठली होती. आशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात कशाला? जी भावना शिवभक्तांची आहे तीच भावना माझी आहे".

तसेच नंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, "जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये. क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. तो महाराष्ट्राचा दुश्मन होता, देशद्रोही, राष्ट्रद्रोही होता, अशा या औरंग्याच्या खाणाखुणा महाराष्ट्रात कशाला पाहिजे. जे उदात्तीकरण करतात त्यांचा निषेध केला पाहिजे".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा