Eknath Shinde Eknath Shinde
ताज्या बातम्या

Eknath Shinde : “बाळासाहेब असते तर उलटं टांगून फटके दिले असते” ठाकरे बंधूंवर घणाघात

या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. भाषणात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत वातावरण तापवले.

Published by : Riddhi Vanne

राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार रंगात आला असून मुंबईतील वरळी येथे महायुतीची मोठी सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. भाषणात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत वातावरण तापवले.

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यावर शिंदे यांनी मराठी मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. “मराठी माणसासाठी नेमकं काय केलं?” असा थेट सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे असते तर अशा राजकारणाला कधीच माफी दिली नसती, असेही ते म्हणाले.

मुंबईला अडथळ्यांचं नाही तर प्रगतीचं सरकार हवं असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि गैरकारभारातून मुंबईला मुक्त करायचं असून यावेळी महायुतीचाच झेंडा फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, स्वार्थी राजकारणामुळे मराठी माणूस फसवला गेला. भावना नाही तर विकास महत्त्वाचा आहे. मुंबईकर आता जागरूक झाले असून केवळ घोषणा नव्हे, तर काम करणाऱ्यांनाच संधी देतील, असा दावा त्यांनी केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा