Election Commission of India : निवडणूक आयोगाची धडक कारवाई; महाराष्ट्रातील 44 सह 474 पक्षांची नोंदणी रद्द Election Commission of India : निवडणूक आयोगाची धडक कारवाई; महाराष्ट्रातील 44 सह 474 पक्षांची नोंदणी रद्द
ताज्या बातम्या

Election Commission of India : निवडणूक आयोगाची धडक कारवाई; महाराष्ट्रातील 44 सह 474 पक्षांची नोंदणी रद्द

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; महाराष्ट्रातील 44 पक्षांसह 474 पक्षांची नोंदणी रद्द

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • देशातील नोंदणीकृत नसलेल्या आणि निवडणुकीत सलग सहा वर्षे सहभागी न झालेल्या राजकीय पक्षांवर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली.

  • योगाने तब्बल 474 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली असून यामध्ये महाराष्ट्रातील 44 पक्षांचा समावेश आहे.

  • लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार, एखादा नोंदणीकृत राजकीय पक्ष सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत सहभागी झाला नाही, तर त्याची नोंदणी रद्द केली जाऊ शकते.

देशातील नोंदणीकृत नसलेल्या आणि निवडणुकीत सलग सहा वर्षे सहभागी न झालेल्या राजकीय पक्षांवर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. आयोगाने तब्बल 474 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली असून यामध्ये महाराष्ट्रातील 44 पक्षांचा समावेश आहे.

लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार, एखादा नोंदणीकृत राजकीय पक्ष सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत सहभागी झाला नाही, तर त्याची नोंदणी रद्द केली जाऊ शकते. या नियमाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी ऑगस्ट 2025 मध्ये निवडणूक आयोगाने 334 पक्षांची नोंदणी रद्द केली होती. त्यामुळे मागील दोन महिन्यांत एकूण 808 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

नोंदणीकृत राजकीय पक्षांना करसवलतीसह अनेक सोयी मिळतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून काही पक्षांनी आपले आर्थिक लेखापरीक्षण सादर केले नव्हते. तसेच सलग सहा वर्ष निवडणुकीपासून दूर राहिल्याने त्यांच्यावर गंडांतर आले.

आयोगाने ज्या पक्षांची नोंदणी रद्द केली आहे ते 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 121 पक्ष, मध्य प्रदेशातील 23 पक्ष, हरियाणातील 17 पक्ष, बिहारमधील 15 पक्ष, पंजाबमधील 21 पक्ष आणि महाराष्ट्रातील 44 पक्ष सामील आहेत.

निवडणूक आयोगाच्या रडारवर सध्या आणखी 359 राजकीय पक्ष आहेत. यामध्ये अनेक पक्षांनी तीन वर्षांपासून आर्थिक माहिती सादर केलेली नाही आणि सहा वर्षे निवडणुकांपासून लांब आहेत. लवकरच त्यांच्याविरोधातही कारवाई होण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kalyan Traffic : कल्याणमध्ये नवरात्रोत्सवात जड वाहनांवर बंदी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा निर्णय

Mumbai To Nanded Special Trains : सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांना दिलासा, मुंबई-नांदेड दरम्यान चार विशेष गाड्या

Makarand Anaspure : मराठा-ओबीसी वादावर मकरंद अनासपुरेंचा शांततेचा संदेश; "समाज तुटू नये..."

Navnath Waghmare : ओबीसी मोर्चात नवनाथ वाघमारेंची सुरेश धसांवर टीका; ‘आष्टीचा जब्या पुन्हा मुंडेंकडे येईल’