ताज्या बातम्या

Ind vs Eng 1st Test Match : खेळाडूंच्या शतकांचा डोंगर; तरीही भारताने पहिला कसोटी सामना गमावला, इंग्लंडचा 5 गडी राखून विजय

इंग्लंडच्या संघानं या धावांचा पाठलाग करत 5 गडी गमावून 373 धावा केल्या.

Published by : Rashmi Mane

भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होताच भारताने प्रथम फलंदाजी करत 471 धावांचा डोंगर रचला. पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या फलदाजांनी उत्तम खेळी करत तीन जणांनी दमदार शतक ठोकले. यामध्ये शुभमन गील, ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वालच्या नावांचा समावेश होता. तर इंग्लंडचा संघ पहिल्या इनिंगमध्ये सर्व गडी बाद 465 धावांमध्ये संपुष्टात आली. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने पुन्हा जोषात फलंदाजी करत 364 धावा केल्या. याहीवेळी ऋषभ पंत आणि के. एल. राहुल यांची शतकी खेळी पाहायला मिळाली. तर इंग्लंडला 371 धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या संघानं या धावांचा पाठलाग करत 5 गडी गमावून 373 धावा केल्या. या विजयासह इंग्लंड संघाने भारताविरोधातील पहिला कसोटी सामना जिंकला. मात्र अजून चार कसोटी सामने खेळले जाणार असून भारताला आणखी उत्तम खेळ दाखवण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप