ताज्या बातम्या

कापूस प्रश्नाबाबत पाचोरा येथे शेतकरी आक्रमक , पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अडवला ताफा

Published by : Siddhi Naringrekar

मंगेश जोशी, जळगाव

कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून कापसाला शासनाने 12 हजारापेक्षा जास्त हमीभाव जाहीर करावा या मागणी साठी राज्यभरात शेतकऱ्यांनी अनेक आंदोलन देखील केले आहेत. तर कापूस कोंडी सोडण्यासाठी पाचोरा येथील शेतकरी अधिवेशन काळात मंत्रालयावर धडकले होते.

मात्र तरी देखील कापूस प्रश्नाबाबत शासन लक्ष देत नसल्याने पाचोरा येथील शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी पाचोरा येथील जामनेर रस्त्यावर आमदार ,खासदार , मंत्री यांना गाव बंदी आंदोलन पुकारले असून याच पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेळाव्यासाठी पाचोरा येथे आलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा शेजाऱ्यांनी अडवत कापसाला 12 हजार 300 रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी गुलाबराव पाटील यांना निवेदन देवून आपली व्यथा मांडत तात्काळ कापसाला हमीभाव द्यावा अशी मागणी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक