ताज्या बातम्या

Solapur : पंचनामे झाले तरी मदत मिळेना, शेतकऱ्यांचा ओढ्याच्या पाण्यात बसून आक्रोश

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. अतिवृष्टी होऊन अनेक भागांमध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे.

Published by : Prachi Nate

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. (Rain) अतिवृष्टी होऊन अनेक भागांमध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र, पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. दरम्यान, महापुरामुळे सीना नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी शेतात पाणीच पाणी साचले.

ज्यामुळे तिऱ्हे येथील एका शेतातील मक्याचे पीक पूर्ण पाण्यात झोपल्याचे पाहायला मिळाले. यानंतर तिऱ्हे येथील शेतामधील पिकांचे पंचनामे झाले नसल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांचे ओढ्याच्या पाण्यात बसून आंदोलन केलं आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकरी नेते विकी बाबा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात केली. पंचनामे झाले तरी शेतकऱ्यांना कोणते पद्धतीची मदत मिळाली नाही या निषेधार्थ, अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे शेत शिवारात ओड्याच्या पाण्यात बसून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Laxman Hake Car Attacked : "स्वत:च्या हल्ल्याचा स्टंट...म्हणून केला", हाकेंवर झालेल्या हल्ल्यावर जरांगेंनी केला मोठा खुलासा! म्हणाले,

New Rules : 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नवे नियम; यूपीआय सेवांवर थेट परिणाम

Washim Hospital: वाशिम रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांकडे शरीर सुखाची मागणी; आरोग्य विभागात नेमकं काय सुरू?

Bullet Train : लवकर बुलेट ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत येणार, रेल्वेमंत्र्यांनी सांगितली तारीख