शेतकऱ्यांचा किसान लाँग मार्च स्थगित झाला आहे. अशी माहिती शेतकरी नेते जे.पी.गावित यांनी दिली आहे. जे. पी. गावित यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला निवेदनाची प्रत दिली. 70 टक्के मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारच्या निवेदनाची प्रत मोर्चेकरांना वाचून दाखवणार असल्याचे गावित यांनी सांगितले.
तसेच आमच्या मागण्या मान्य केल्याबद्दल सरकारचे आभार. असे देखिल त्यांनी म्हटले आहे.