ताज्या बातम्या

Gadchiroli Flood : गडचिरोली-चंद्रपूरमध्ये पूरस्थिती; दीडशे गावांचा संपर्क तुटला

राज्यात पावसाची जोरदार सुरवात झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

Gadchiroli Flood : राज्यात पावसाची जोरदार सुरवात झाली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे दीडशे गावांचा संपर्क तुटला आहे.दक्षिण गडचिरोलीकडून चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. त्यामुळे सहा तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला आहे.

ओढ्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळं गडचिरोली जिल्ह्यातील आठ प्रमुख मार्ग बंद झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आता नागरिकांना गडचिरोलीत येण्यासाठी पूरातून मार्ग शोधावा लागत आहे. डचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून होत असलेल्या पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं दुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.

नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भामरागड तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा