ताज्या बातम्या

धक्कादायक! उधारीचे पैसे परत न दिल्याने मित्रांनीच केली मित्राची हत्या

कल्याण कोळशेवाडी भागातील तिसगांव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : shweta walge

मयरेश जाधव, अंबरनाथ : कल्याण कोळशेवाडी भागातील तिसगांव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. उधारीचे पैसे परत न दिल्याने मित्रांनीच आपल्या मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आर्श्चयाची बाब म्हणजे आरोपीने हत्या करुन पोलीस स्टेशनमध्ये फोन करून मी माझ्या मित्राची हत्या केल्याचे सांगितले.

कल्याण कोळशेवाडी परिसरात राहणाऱ्या राजेश्वर पांडे यांनी व विपिन दुबे हे गेले पाच वर्षापासून एकमेकांना ओळखत असून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. काही दिवसापूर्वी विपिनला गरज असल्याने राजेश्वर पांडे यांनी त्याला उसनेवार पैसे दिले होते. मात्र त्यानंतर विपिन कडे आपल्या पैशाची मागणी केली असता नेहमी विपिन उडूवाडूचे उत्तर देत पैसे देण्यास नकार द्यायचा यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. आज दुपारच्या सुमारास राजेश्वर पांडे यांनी विपिन दुबेला आपल्या घरी पार्टी असून घरी येण्यास सांगितले व विपिनला मटन आणि दारूची पार्टी केली त्यानंतर आपल्या पैशाची मागणी केली. दारूच्या नशेती पैसे देत नसल्याचे सांगितल्याने संतप्त झालेल्या राजेश्वर ने धारदार हत्यांनी त्याची हत्या करून पोलीस स्टेशनमध्ये फोन करून मी माझ्या मित्राची हत्या केली असल्याचं सांगितल्या नंतर पोलीस घटनास्थळी पोचून आरोपीला अटक केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा