ताज्या बातम्या

पालकमंत्रिपदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा, गणेश नाईक म्हणाले...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु झाली आहे ती पालकमंत्रिपदाची.

Published by : Siddhi Naringrekar

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु झाली आहे ती पालकमंत्रिपदाची. पालकमंत्रिपदावरुन आता रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदाबाबत राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणेश नाईक म्हणाले की, महायुतीचे तीन पक्ष आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि सगळ्या गोष्टींची मांडणी करतील. एक जानेवारीनंतरच या सर्व गोष्टी होतील.

यासोबतच ते म्हणाले की, काम करायची इच्छा असेल ना तर तुम्ही पालकमंत्री नसतानासुद्धा तुम्ही तुमची वागण्याची, बोलण्याची पद्धत जर नीट ठेवली तर प्रत्येक खात्यातला अधिकारी तुमच्या सूचना नाकारणार नाही. असे गणेश नाईक म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली