लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज "उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आणि दीपक बिल्डर अॅंड डेवलपर्स प्रस्तुत या कार्यक्रमाला आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांची ध्येयधोरणे काय असतील? यावर सविस्तर माहिती या कार्यक्रमात मांडली जाणार आहे. तसेच महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली आणि छगन भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांना सरकारकडून आणखी किती मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे ? प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की,.......
माणिकराव कोकाटे म्हणाले की... "सर्व पंचनामे झाल्यानंतर जी रक्कम समोर येणार आहे, ती सरकारला द्यावीच लागणार आहे. कारण शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. NDRF, MDRF यांच्या मार्फ़त आपण मदत करत आहोत मात्र ती मदत अगदी कमी आहे. विमा कंपन्यांमार्फत देखील मदतीचा ओघ सुरु कारण गरजेचं आहे. यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. सध्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकार शेकऱ्यांच्या खात्यात पैसे लवकरात लवकर जमा करण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचे प्रयत्न सुरु आहे."