हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे आज, रविवार पहाटेपासूनच पावसानं जोर कायम ठेवला आहे. शनिवार सुरू झालेल्या संततधार पावसाची रिपरिप आजही सुरू आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण शहरांसह कोकण किनार पट्ट्यांवरही पावसानं हजेरी लावली आहे. आजही मुंबई, ठाणे आणि पालघरला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. दरम्यान, राज्यभरात आजपासून मान्सून जोर धरणार असून कोकणात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तसचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा