ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Published by : Rashmi Mane

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून पुढील २-३ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून सतत दीड महिना पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामंही खोळंबली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर या तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरु लागली आहे. अनेक शेतकऱ्यांची पावसाळापूर्व मशागतीची कामं, तसेच पावसाळी घेतली जाणारी पिकं अद्याप घेतली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या परिसरात 5 हजार 153 मिलिमिटर पाऊस फक्त दीड महिन्यात झाला असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा