ताज्या बातम्या

हेरंब कुलकर्णी यांच्यावर सुपारी देऊन झाला हल्ला

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ला सुपारी घेऊन करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

Published by : Team Lokshahi

अहमदनगर | सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ला सुपारी घेऊन करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पंधरा हजार रुपयांत कुलकर्णी यांना संपवून टाकण्याची सुपारी देण्यात आली होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या कटातील अक्षय विष्णू सब्बन, चैतन्य सुनील सुडके यासह एक अल्पवयीन अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय आणि सनी जगधने हे दोघे फरार आहेत. यातील चैतन्य सुडके याच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय सब्बन याची सीताराम सारडा शाळेजवळ पानटपरी होती. या टपरीला मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी हरकत घेतली. त्यांच्या तक्रारीवरून महापालिकेने टपरी हटविली होती. त्यामुळे पोलिसांचा सब्बन याच्यावर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, तो माहिती देत नव्हता. सीसीटीव्हीत हल्लेखोरांचे दुचाकीवर फोटो मिळाले होते. या फुटेजमधील एका आरोपीसारखा दिसणारा मुलगा कोंड्यामामा चौकात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा