Pollution  Pollution
ताज्या बातम्या

Pollution : प्रदूषाणाबाबत दिल्ली सोडते मुंबईला मागे, धक्कादायक माहिती समोर

मुंबईत वाढत चाललेल्या हवा प्रदूषणावर आणि बांधकाम ठिकाणांवरील धोकादायक परिस्थितीवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Published by : Riddhi Vanne

मुंबईत वाढत चाललेल्या हवा प्रदूषणावर आणि बांधकाम ठिकाणांवरील धोकादायक परिस्थितीवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस पावले उचलली नाहीत, तर मुंबईलाही दिल्लीसारखी गंभीर अवस्था भोगावी लागू शकते, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.

मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर कठोर शब्दांत टीका केली. महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देत, हवा प्रदूषण रोखण्यासाठी नेमक्या उपाययोजना काय केल्या आहेत याची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे.

मुंबई आणि परिसरातील हवेचा दर्जा सतत खालावत असल्याने न्यायालयाने स्वतःहून (स्वयंप्रेरणेने) या प्रकरणाची दखल घेतली आहे. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर काहीच करता येत नाही, हे आपण दिल्लीत मागील काही वर्षांत पाहिले आहे. नागरिक म्हणून आणि न्यायालय म्हणून पर्यावरणाचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने बांधकाम मजुरांच्या आरोग्याबाबतही प्रश्न उपस्थित केला. धूळ आणि प्रदूषणाच्या थेट संपर्कात येणाऱ्या कामगारांसाठी तात्काळ काय उपाय करण्यात आले, याचे उत्तर देण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या 1,080 सेन्सर्सपैकी सुमारे 220 सेन्सर्स कार्यरत नसल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत, न्यायालय आदेश देईपर्यंत अधिकारी जागे होत नसतील, तर अशा यंत्रणांचा काही उपयोग नाही, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. याशिवाय, अनेक बांधकाम ठिकाणी आवश्यक सुरक्षेची साधने नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. धूळ रोखण्यासाठी लावायच्या पत्र्या किंवा हिरव्या जाळ्या न लावता काम सुरू असल्याचे समोर आले. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यापासून 433 बांधकाम स्थळांना नोटीस पाठवण्यात आली असून, त्यापैकी 148 ठिकाणी काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

थोडक्यात

  1. मुंबईत दिवसेंदिवस हवा प्रदूषणाची पातळी धोकादायकरीत्या वाढत आहे, यावर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

  2. बांधकाम स्थळांवरील नियमांचे उल्लंघन होत असून, धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत.

  3. प्रदूषण रोखण्यात महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) अपयशी ठरत असल्याची स्पष्ट नाराजी.

  4. नियम फक्त कागदावर न ठेवता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

  5. तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर मुंबईलाही दिल्लीसारखी गंभीर प्रदूषणाची अवस्था येऊ शकते, असा इशारा.

  6. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे न्यायालयाचे मत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा