Admin
Admin
ताज्या बातम्या

माझं नाव सावरकर नाही तर गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाहीत - राहुल गांधी

Published by : Siddhi Naringrekar

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पत्रकार परिषद घेत अदाणींच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, मी माफी मागणार नाही. माझं नाव सावरकर नाही तर गांधी, मी माफी मागत नाही असे राहुल गांधी म्हणाले. दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राहुल गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, संसदेत मी अदानी - मोदी यांचे नाते काय, 20 हजार कोटी कुणाचे? एवढाच प्रश्न विचारला.

राहुल गांधी म्हणाले की, अदानीची शेल कंपनी आहे. त्यात 20 हजार कोटी कोणी गुंतवले? ते अदानीचे पैसे नाहीत. मी एवढाच प्रश्न विचारला होता. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यापासून त्यांचे नाते आहेमी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सांगितलं आहे. पण भाजपचे मंत्री सभागृहातही खोटं बोलत असतात.

तसेच मी अदानी आणि मोदी यांच्या संबंधावर भाष्य केलं. म्हणून माझी खासदारकी रद्द केली गेली. माझी खासदारकी रद्द करून मी गप्प बसेन असं तुम्हाला वाटत असेल. पण मी गप्प बसणार नाही.मी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारत राहणार. मला धमकावून तोंड बंद करु शकत नाही. असे राहुल गांधी म्हणाले.

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...