ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil On OBC Mahamorcha : "जीआर रद्द झाल्यास पुढचा डाव टाकू" मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

आज उपराजधानी नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला आहे. याचपार्श्वभूमिवर, राहुल गांधींच्या सांगण्यावरुन जीआर रद्द झाल्यास पुढचा डाव टाकू असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Published by : Prachi Nate

आज उपराजधानी नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला आहे. 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. याचपार्श्वभूमिवर मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला आहे.

नागपूरचा मोर्चा ओबीसीचा नाही तर काँग्रेसचा आहे, राहुल गांधींच्या सांगण्यावरुन जीआर रद्द झाल्यास पुढचा डाव टाकू असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. "आपला पक्ष कसा वाढवायचा ओबीसींना कसं खेचायचं, तर मगं आपण मरांठ्यांच्या विरोधात बोंबल पाहिजे. मराठ्यांच आरक्षण कसं घालवायचं, याच्यासाठी मरण येईना म्हणून पाय खोडायचं काम चालू आहे राहुल गांधींच्या सांगण्यावरुन".

"त्यामुळे त्या पद्धतीने तो काँग्रेसचा मोर्चा आहे. ते काय ओबीसीसाठी नाही, ओबीसींच्या हक्कासाठी नाही, ओबीसींच कल्याण व्हाव म्हणून तर अजिबात नाही. जीआर रद्द होत नसतो आणि जर जीआर रद्द झाला तर आम्ही पण मग सांगतो. मग काय डाव टाकायचा ते आम्ही पण सांगतो. यांच्या षडयंत्रणाला आणि यांचे डाव पाडायला मी पक्का आहे".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा