ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

दोघांनाही समजले की, त्यांच्या फूटीतून तिसऱ्याचा फायदा होतोय, ठाकरेंच्या एकत्र येण्याने भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर मिळाले आहे, इम्तियाज जलील यांचा निशाणा.

Published by : Team Lokshahi

बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेला तोडण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप करत, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रातील जनता शिवसेनेला मानणारी आहे. पण भाजपला हे माहित होते की, जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत त्यांना सत्ता मिळणार नाही, म्हणूनच त्यांनी शिवसेनेत फूट पाडली, असे जलील म्हणाले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे वेगळे होणे सत्तेसाठी नव्हते, तर अहंकार व महत्वाच्या स्थानासाठी असलेल्या मतभेदांमुळे होते. राज ठाकरे यांना वाटायचे की त्यांना योग्य तो सन्मान मिळत नाही आणि बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंना पुढे नेत आहेत, त्यामुळे त्यांनी वेगळी वाट घेतली होती. पण आज दोघांनाही समजले आहे की, त्यांच्या फूटीतून तिसऱ्याचा म्हणजेच भाजपचा फायदा झाला आहे. भाजपने शिवसेनेत फूट पाडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला आपल्या सोबत घेऊन सत्ता मिळवली, असा आरोप जलील यांनी केला.

राज आणि उद्धव ठाकरे आज पुन्हा एकत्र आले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील लोक आनंदित झाले आहेत. त्यांच्या एकत्रित येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संदेश गेला आहे, असे जलील यांनी स्पष्ट केले. भाजपने केवळ शिवसेनेला फोडले नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात केला आहे. आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर मिळाले आहे, असेही जलील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना