ताज्या बातम्या

Unseasonal Rain: पावसाचा जोरदार तडाखा! राज्यातील शेतकऱ्यांचे पीक भुईसपाट

महाराष्ट्रातील शेतकरी: अवकाळी पावसाने पीक नुकसान, भरपाईची मागणी

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात मार्च March ते मे May या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर मोठा संकटाचा डोंगर कोसळला आहे. नाशिक Nashik, नगर, सोलापूर Solapur, अमरावती Amravati, बुलढाणा Buldhana, जालना Jalna आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यांतील सुमारे 1,56,055 एकर (62,422 हेक्टर) पीक क्षेत्रात झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सुमारे एक लाख शेतकऱ्यांना या निसर्गाच्या कोपामुळे आर्थिक फटका बसला आहे.शेतकरी हवालदिल आहेत, शेतीच्या नुकसानींचे "पंचनामे कधी होणार?" हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला असे, शेतकरी म्हणतात, "पिकं गेली, पैसे गेले, आता पंचनाम्यांची प्रतीक्षा करत काळजात धसका घेत जगावं लागतंय."

सर्वाधिक फटका फळबागांना

या पावसात केळी, आंबा, डाळिंब, द्राक्ष अशा फळबागांवर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय मका, गहू, ज्वारी, कांदा, भुईमूग, भाजीपाला या महत्वाच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, सांगोला, मंगळवेढा तालुक्यात नुकसान अधिक आहे. फक्त सोलापूर जिल्ह्यात 3,700 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

फक्त मागील 15 दिवसांतच राज्यातील 7 जिल्ह्यांतील 49,228 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात एप्रिल महिन्यातील 16 जिल्ह्यांतील 13,194 हेक्टर पिकांचे नुकसानही धरले तर एकूण हानीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल आणि मे 2024 मध्येही राज्यात 1.18 लाख हेक्टरवरील पीक नुकसान झाल्याची नोंद आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकटाची मालिका कायम राहिली आहे.

राज्य शासनाने नुकसानीचा अहवाल मागवला असून, 1 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. पण पंचनामेच न झाल्यास ती भरपाई मिळणार कशी, हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. राज्य शासनाने महसूल यंत्रणेला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा लाखो शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा