ताज्या बातम्या

Unseasonal Rain: पावसाचा जोरदार तडाखा! राज्यातील शेतकऱ्यांचे पीक भुईसपाट

महाराष्ट्रातील शेतकरी: अवकाळी पावसाने पीक नुकसान, भरपाईची मागणी

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात मार्च March ते मे May या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर मोठा संकटाचा डोंगर कोसळला आहे. नाशिक Nashik, नगर, सोलापूर Solapur, अमरावती Amravati, बुलढाणा Buldhana, जालना Jalna आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यांतील सुमारे 1,56,055 एकर (62,422 हेक्टर) पीक क्षेत्रात झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सुमारे एक लाख शेतकऱ्यांना या निसर्गाच्या कोपामुळे आर्थिक फटका बसला आहे.शेतकरी हवालदिल आहेत, शेतीच्या नुकसानींचे "पंचनामे कधी होणार?" हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला असे, शेतकरी म्हणतात, "पिकं गेली, पैसे गेले, आता पंचनाम्यांची प्रतीक्षा करत काळजात धसका घेत जगावं लागतंय."

सर्वाधिक फटका फळबागांना

या पावसात केळी, आंबा, डाळिंब, द्राक्ष अशा फळबागांवर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय मका, गहू, ज्वारी, कांदा, भुईमूग, भाजीपाला या महत्वाच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, सांगोला, मंगळवेढा तालुक्यात नुकसान अधिक आहे. फक्त सोलापूर जिल्ह्यात 3,700 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

फक्त मागील 15 दिवसांतच राज्यातील 7 जिल्ह्यांतील 49,228 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात एप्रिल महिन्यातील 16 जिल्ह्यांतील 13,194 हेक्टर पिकांचे नुकसानही धरले तर एकूण हानीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल आणि मे 2024 मध्येही राज्यात 1.18 लाख हेक्टरवरील पीक नुकसान झाल्याची नोंद आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकटाची मालिका कायम राहिली आहे.

राज्य शासनाने नुकसानीचा अहवाल मागवला असून, 1 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. पण पंचनामेच न झाल्यास ती भरपाई मिळणार कशी, हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. राज्य शासनाने महसूल यंत्रणेला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा लाखो शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू