ताज्या बातम्या

Ind Vs Eng 3rd Test Match : भारतीय संघ अडचणीत; मध्यांनापर्यंत 8 गडी बाद, रवींद्र जडेजावर मोठी जबाबदारी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी लंचपर्यंत भारताची अवस्था 112 धावांवर 8 बाद अशी झाली आहे.

Published by : Rashmi Mane

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी लंचपर्यंत भारताची अवस्था 112 धावांवर 8 बाद अशी झाली आहे. 193 धावांचे आव्हान असलेल्या भारताला अजूनही 81 धावांची गरज आहे. पण केवळ दोन विकेट्स शिल्लक असल्यामुळे सामना आता इंग्लंडच्या बाजूला झुकला आहे. मध्यांनाच्या सुट्टीपर्यंत भारताच्या 112 धावा झाल्या असून भारताने 8 गडी गमावले होते.

सकाळच्या सत्रात इंग्लंडने प्रभावी कामगिरी करत भारताचे चार महत्त्वाचे फलंदाज माघारी धाडले. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी एकत्रित दबाव निर्माण करत के.एल. राहुल, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांना लवकर बाद केलं. लंचच्या काही क्षणांपूर्वी नितीश रेड्डीदेखील माघारी गेल्याने भारत मोठ्या संकटात सापडला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत वाठवलं. त्यांच्या जोफ्रा आर्चरनं सर्वाधिक 3 बळी घेतले असून बेन स्टोक्स आणि ब्रायडॉन कार्स्टनं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

चौथ्या दिवशीही भारताची परिस्थिती नाजूक झाली होती. इंग्लंडने आपला डाव 154 धावांमध्ये 4 गडी बाद या टप्प्यावर संपवला. पण त्यानंतर त्यांचा डाव अवघ्या 192 धावांत आटोपला. वॉशिंग्टन सुंदरने या पतनात मोठा वाटा उचलत 12.1 षटकांत 22 धावांत 4 बळी घेतले. ही इंग्लंडमध्ये भारतीय फिरकीपटूकडून झालेली गेल्या 23 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

सध्या सामना निर्णायक वळणावर आहे. भारताला विजयासाठी अफाट संघर्ष करावा लागणार आहे, तर इंग्लंड केवळ दोन विकेट्सपासून ऐतिहासिक विजयापासून दूर आहे.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind vs Eng 3rd Test Match : इंग्लंडनं 22 धावांनी सामना जिंकला; जडेजा-सिराजची झुंज अपयशी, इंग्लंड संघ 2-1 नं आघाडीवर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या व्हिडिओ काढण्यासंबंधीत 'त्या' विधानामुळे वादंग; मिश्रा, शर्मा, राय या वकिलांची महासंचालकांकडे तक्रार

Jio New Plans : युजर्ससाठी Jio चा नवीन 84 दिवसांचा प्लॅन; जाणून घ्या फायदे