ताज्या बातम्या

Ind Vs Eng 3rd Test Match : भारतीय संघ अडचणीत; मध्यांनापर्यंत 8 गडी बाद, रवींद्र जडेजावर मोठी जबाबदारी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी लंचपर्यंत भारताची अवस्था 112 धावांवर 8 बाद अशी झाली आहे.

Published by : Rashmi Mane

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी लंचपर्यंत भारताची अवस्था 112 धावांवर 8 बाद अशी झाली आहे. 193 धावांचे आव्हान असलेल्या भारताला अजूनही 81 धावांची गरज आहे. पण केवळ दोन विकेट्स शिल्लक असल्यामुळे सामना आता इंग्लंडच्या बाजूला झुकला आहे. मध्यांनाच्या सुट्टीपर्यंत भारताच्या 112 धावा झाल्या असून भारताने 8 गडी गमावले होते.

सकाळच्या सत्रात इंग्लंडने प्रभावी कामगिरी करत भारताचे चार महत्त्वाचे फलंदाज माघारी धाडले. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी एकत्रित दबाव निर्माण करत के.एल. राहुल, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांना लवकर बाद केलं. लंचच्या काही क्षणांपूर्वी नितीश रेड्डीदेखील माघारी गेल्याने भारत मोठ्या संकटात सापडला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत वाठवलं. त्यांच्या जोफ्रा आर्चरनं सर्वाधिक 3 बळी घेतले असून बेन स्टोक्स आणि ब्रायडॉन कार्स्टनं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

चौथ्या दिवशीही भारताची परिस्थिती नाजूक झाली होती. इंग्लंडने आपला डाव 154 धावांमध्ये 4 गडी बाद या टप्प्यावर संपवला. पण त्यानंतर त्यांचा डाव अवघ्या 192 धावांत आटोपला. वॉशिंग्टन सुंदरने या पतनात मोठा वाटा उचलत 12.1 षटकांत 22 धावांत 4 बळी घेतले. ही इंग्लंडमध्ये भारतीय फिरकीपटूकडून झालेली गेल्या 23 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

सध्या सामना निर्णायक वळणावर आहे. भारताला विजयासाठी अफाट संघर्ष करावा लागणार आहे, तर इंग्लंड केवळ दोन विकेट्सपासून ऐतिहासिक विजयापासून दूर आहे.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा