ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : आता पाकिस्तानमधील टपाल, पार्सल देवाणघेवाणीवरही बंदी; दळणवळण मंत्रालयाचा निर्णय

भारताने पाकिस्तानची पुन्हा एकदा कोंडी केली आहे. त्यांनी पाकिस्तानसोबतच्या पत्रव्यवहारावरही बंदी घातली आहे.

Published by : Rashmi Mane

भारताने (India) पाकिस्तानची (Pakistan) पुन्हा एकदा कोंडी केली आहे. त्यांनी पाकिस्तानसोबतच्या पत्रव्यवहारावरही बंदी घातली आहे. केंद्राच्या दळणवळण मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून भारत सरकारने पाकिस्तानमधून हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने येणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सलची (parcels) देवाणघेवाण स्थगित केली आहे. सोबतच पाकिस्तानच्या सर्व प्रकारच्या जहाजांवरही भारताने बंदी घातली असून केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित केला, तर वस्तूंवरील आयात-निर्यातींवरही बंदी घालण्यात आली. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत देश सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटर्सच्या इन्स्टा अकाऊंटवर भारतात बंदी घातली. आता पाकिस्तानसोबतच्या टपाल आणि पार्सल सेवांच्या देवाण-घेवाणीवरही स्थगिती आणण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू