पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे. 7 मे रोजी भारताने दहशतवाद्यांची 9 तळ उद्ध्वस्त केल्यांनतर आता पाकिस्तान आणि भारतातला तणाव वाढताना दिसत आहे. (India-Pakistan War)
पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून चोख उत्तर दिलं जात असून भारतानं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीसह अनेक क्षेपणास्त्र नष्ट केलीत. भारतानं पाकिस्तानचा ड्रोन हल्ला हाणून पाडला आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तानची हाय-टेक लढाऊ विमानं एफ-16 आणि जेएफ 17 पाडली आहेत.
यातच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan PM Shahbaz Sharif) यांच्या घरापासून फक्त आणि फक्त 20 किलोमीटर अंतरावर मोठा स्फोट झाला. त्यानंतर तातडीनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बंकरमध्ये हलवण्यात आलं.