ताज्या बातम्या

Pune Pimpri Chinchwad : नक्की चाललंय काय? पिंपरी चिंचवडमध्ये दीड वर्षात 30 विवाहितेंचा बळी

पिंपरी चिंचवड शहरात दीड वर्षांत तब्बल 30 विवाहित महिलांनी आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Prachi Nate

एकीकडे वैष्णवीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात दीड वर्षांत तब्बल 30 विवाहित महिलांनी आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. या आत्महत्यांमागे मानसिक छळ, हुंड्याची मागणी, पतीचे व्यसनाधीन वर्तन, कौटुंबिक कलह, संशयाचे वातावरण, आर्थिक अडचणी, सासरच्या मंडळींचा अपमानास्पद वागणूक ही मुख्य कारणे आहेत.

पावणे तीनशे महिलांनी सासरच्या मंडळींवर कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि मानसिक त्रास देत असल्याचे आरोप करत पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. या घटना जानेवारी 2024 पासून ते मे 2025 या कालावधीत घटना घडल्या असून, त्यातील बहुतांश प्रकरणे समाजाच्या मुख्य प्रवाहातून दुर्लक्षितच राहिली आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा