ताज्या बातम्या

भारत-चीनमधील चकमकीचा मुद्दा संसदेत गाजणार

Published by : Siddhi Naringrekar

9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. चिनी सैनिक तवांगच्या याग्त्से भागात भारतीय लष्कराची चौकी हटवू इच्छित होते. परंतु, भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन ते परतवून लावले. असे मिळालेल्या माहितीनुसार समजते.

याच पार्श्वभूमीवर आज चीन आणि भारताच्या सैनिकांमधील या चकमकीचा मुद्दा विरोधक संसद अधिवेशनात काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, हा मुद्दा उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीबाबत जोरदार टीका केली आहे. अरुणाचल प्रदेशातून येणाऱ्या बातम्या चिंताजनक आहेत. भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी चकमक झाली आणि सरकारने अनेक दिवस देशाला अंधारात ठेवले. संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे का सांगण्यात आले नाही? घटनेचा तपशील अपूर्ण आहे. असे ते म्हणाले.

तसेच ते म्हणाले की, ‘लष्कर चीनला कधीही चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील कमकुवत राजकीय नेतृत्वामुळे चीनचा हा अपमान झाला आहे. संसदेत यावर तातडीने चर्चा होण्याची गरज आहे. मी उद्या या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडणार आहे.

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...