ताज्या बातम्या

Jayakwadi Dam : हवामान बदलामुळे जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन थांबले, चार दिवसांत शून्य दर

हवामान बदलामुळे जायकवाडी धरणातील पाण्याचे अपव्यय थांबले

Published by : Shamal Sawant

मराठवाड्याच्या पाण्याच्या गरजांची मुख्य आधारवड असलेल्या जायकवाडी धरणासाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून हवामानात झालेल्या बदलांमुळे आणि अवकाळी पावसामुळे धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनामध्ये लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसांत बाष्पीभवनाचा दर थेट शून्यावर पोहोचल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

सध्या जायकवाडी धरणात २९.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आणि या साठ्याचे नियोजन ३१ जुलैपर्यंत पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात, विशेषतः मे महिन्याच्या सुरुवातीला, दररोज जवळपास २ दलघमी इतके पाणी बाष्पीभवनामुळे नष्ट होत होते. अभियंते विजय काकडे यांच्या म्हणण्यानुसार, एवढ्या पाण्याने मराठवाड्यातील दहा दिवसांची तहान भागली असती. मात्र, सध्या हवामानातील बदलांमुळे हे बाष्पीभवन थांबले असून, चार दिवसांपासून यामध्ये शून्य दर नोंदवण्यात आला आहे.

हा बदल मराठवाड्यासाठी सुखद आश्चर्य ठरत असून, पाण्याचा अपव्यय थांबवण्यात आणि आगामी काळातील जलसाठा व्यवस्थापनात याचा मोठा फायदा होणार आहे.

धरणातील पाणीसंवर्धनासाठी ही एक सकारात्मक दिशा मानली जात आहे. पुढील काही दिवसांतही असाच हवामानाचा कल राहिल्यास, धरणातील साठा अधिक काळ टिकवता येण्यास मदत होणार आहे. यामुळे पाटबंधारे विभाग, शेतकरी आणि नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख