राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे. असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते. यावर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, एका पक्षाचे 2 तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचे. महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आहे आणि कोण नकली? महाराष्ट्राच्या जनतेनं याचा निकाल घेतलेला आहे. तो मताच्या पेटीत आपल्या सर्वांच्या समोर येईल.