Jayant Pati Team Lokshahi
ताज्या बातम्या

"गुजरात, उत्तर प्रदेशात भोंगे कमी झाले का? याची राज ठाकरेंनी चौकशी करावी"

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.

Published by : Sudhir Kakde

सातारा प्रतिनिधी | प्रशांत जगताप : लोक राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ओळखून आहेत. गुजरात आणि उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथील मशिदीवरील भोंगे कमी झालेत का? असा सवाल आज राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्षाची परिसंवाद यात्रा साताऱ्यात आली असून याची सुरुवात वाई तालुक्यातुन झाली आहे. यावेळी जयंत पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या भोंगा विरुद्ध हनुमान चालिसा या राजकारणावर भाष्य केलं.

राज्यात सध्या राष्ट्रवादीची परिसंवाद यात्रा सुरु असून, पक्ष संघटनेशी संवाद हा या परिसंवाद यात्रेचा उद्देश असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भोंगे कुठे लावा, कुणाच्या मशिदीसमोर लावा हे सुरु आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील मशिदीवरील भोंगे कमी झाले आहेत का? याची चौकशी करण्याचा सल्ला राज ठाकरे यांना सल्लाही जयंत पाटलांनी दिला आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीत राज ठाकरे यांचा मुद्दा महाविकास आघाडीला डिस्टर्ब करू शकणार नाही. लोक राज ठाकरे यांना ओळखून असल्याचा टोला मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक