ताज्या बातम्या

Jitendra Awhad : हा भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने झाला आहे का ? जितेंद्र आव्हाड यांचा धनंजय मुंडेंना सवाल

अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं

Published by : Siddhi Naringrekar

अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटले की, अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत.

मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.

यावर प्रतिक्रिया देत जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटवर परत ट्विट करत म्हटले आहे की, म्हणजे हा भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने झाला आहे का ? काय म्हणायचे आहे मुंडेंना…असे आव्हाडांनी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक