ताज्या बातम्या

Karnataka : कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडीगांनी महाराष्ट्राच्या एसटी बसला काळ फासलं

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एसटी बसवर हल्ला केला. या घटनेमुळे महाराष्ट्र - कर्नाटक आंतरराज्य बस सेवा बंद झाली आहे.

Published by : Prachi Nate

महाराष्ट्रात मराठी भाषेची आणि मराठी माणसाची कोणत्या न कोणत्या कारणाने गळचेपी होताना पाहायला मिळत आहे. अस असताना आता कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात कन्नड येत नाही म्हणून कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्र एसटी बसला आणि बस चालकाला काळे फासल्याच्या घटनेची पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली आहे.

हे लक्षात घेऊन कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणारी बस सेवा थांबवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सकाळपासून महाराष्ट्रातून एकही बस बेळगावकडे आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो आहे. यामुळे सीमा भागातील मराठी लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई बंगळुरू बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

यानंतर बस चालकाला एसटी बसमधून खाली ओढून "कर्नाटकात यायचं असेल तर कन्नड बोलायलाच हवं" असं म्हणत कार्यकर्त्यांनी एसटी बसला आणि चालकाच्या तोंडाला काळे फासले. या घटनेनंतर आता महाराष्ट्र -कर्नाटक आंतरराज्य बस सेवेवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. काही काळासाठी महाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्याच्या आंतरराज्य बस सेवेवा बंद राहणार आहेत. सकाळपासून महाराष्ट्रातून एकही बस बेळगावकडे गेली नाही तसेच कर्नाटक आणि कोल्हापुरातील आंदोलनामुळे खबरदारी घेण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chandrakant Khaire : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खैरेंच्या वक्तव्याची चर्चा; "पुढील गणेशोत्सवापर्यंत आमचं..."

Manoj Jarange Patil : "आम्ही पिढ्यानपिढ्या...त्यामुळे गणेशोत्सवात अडथळा येणार नाही" मनोज जरांगेंच मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी मोठं वक्तव्य

Vaishno Devi Landslide : जम्मू-कश्मीरमध्ये वैष्णोदेवी यात्रामार्गावर भूस्खलन, 31 जणांचा मृत्यू तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली

Mohan Bhagwat : 'हिंदू नाव लावणाऱ्यांना देशाप्रति कटिबद्ध राहावं लागेल'; सरसंघचालक मोहन भागवत यांचं संबोधन