ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकण्याआधी सरकारनं उचलली पावलं; आज सभागृहात निवेदन देणार

शेतकऱ्यांचा लाँग मार्चच्या शिष्टमंडळासोबत काल(16 मार्च) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शेतकऱ्यांचा लाँग मार्चच्या शिष्टमंडळासोबत काल(16 मार्च) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली आहे. शेतकरी शिष्टमंडळासोबत दोन तासांहून अधिक वेळ चर्चा सुरु होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शेतकरी मोर्चाचे नेते जे.पी. गावित यांनी सांगितले आहे. अनेक मागण्यांवर निर्णय झाले असून ते आज अधिवेशानात मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. परंतु, या निर्णयांचा जीआर निघून अंमलबजावणी न झाल्यास लाल वादळ मुंबईला धडक देईल, असा इशारा गावित यांनी दिला आहे.

मात्र, मागील 2018 व 2019 च्या आंदोलनावेळी फक्त आश्वासनावर आंदोलन मागे घेतल्याने आंदोलकांची निराशा झाली होती. यामुळे आज शासनाने कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊन ते विधिमंडळ पटलावर मांडावेत व या सर्व चर्चेचे इतिवृत्त आमच्या हाती द्यावे. तसेच, याचे जीआर काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावे आणि त्यांची अंमलबाजवणी सुरुवात करावी. याची खात्री पटल्यानंतरच आम्ही आंदोलन माघारी घेण्यात येईल. सोमवारपर्यंत जर शासनाने इतिवृत्त हाती दिले नाही, तर सर्व आंदोलन मुंबईच्या दिशेने धडक देतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानात शिक्षक आंदोलकांच्या भेटीला

IAF Plane Crash : राजस्थानात वायुसेनेचे विमान कोसळले; दोन्ही वैमानिकांनी गमावला जीव

Pakistani Actress Death : भयंकर! दोन आठवड्यांपूर्वी मृत्यू, सडलेल्या अवस्थेतील मृतदेह; पाकिस्तानी अभिनेत्रींच्या गूढ मृत्यूची चौकशी होणार

Pune Crime News : प्रेयसीला रबडीतून दिली गर्भपाताची गोळी, पुण्याच्या हिंजवडीतील धक्कादायक प्रकार