सतेज औंधकर, कोल्हापूर
छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही जाहीर वक्तव्य करते. त्याबाबत संहिता लागू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील युवक शुभम शिरहट्टी याने स्वतःच्या रक्ताने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्र लिहिले. शुभम हा शाहू सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे.खोटा इतिहास, अफवा पसरविण्यात येत असल्याने महाराष्ट्रवासीयांची मनं व्यथित होत आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ज्यांचे वक्तव्य, सत्तेच्या हव्यासाच्या बंडाची तुलना शिवपराक्रमाशी होणे, अवमान हे महाराष्ट्राच्या पचनी पडणार नाही. शिवरायांबद्दल कोणीही जाहीर वक्तव्य करते. याबाबत संहिता लागू करावी, जेणेकरून त्याचे तंतोतंत पालन होईल. करवीरनगरीतील या शिवशाहूभक्ताच्या रक्ताच्या पत्राची दखल घ्यावी, अशी विनंती शुभम याने या पत्राद्वारे केली आहे.