Admin
ताज्या बातम्या

लखीमपूर प्रकरणः आशिष मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयाने अटींसह अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयाने अटींसह अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सध्या आशिषला 8 आठवड्यांसाठी सोडण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. परंतु अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द होऊ शकतो. आशिषला सुटकेच्या आठवड्याभरात उत्तर प्रदेश सोडावे लागणार आहे. तो सध्या दिल्लीत राहू शकत नाही.

14 मार्च रोजी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्या दिवशी आज दिलेल्या आदेशाचा आढावा घेतला जाईल. यासोबतच सुप्रीम कोर्टाने हत्येचा आरोप असलेल्या चार शेतकऱ्यांना अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेशही दिले आहेत.

लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थार गाडीखाली चिरडण्यात आल्याची घटना घडली होती. यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतक पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Operation Sindoor : मसूद अजहरच्या कुटुंबाचा अंत! "अन् कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले" जैश कमांडरचा मोठा खुलासा

Local Bodies Election Supreme Court : स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत मोठा निर्णय, पुढच्या वर्षी होणार निवडणुक प्रक्रिया; तारीख जाहीर

Empty Stomach Eating : रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? वाचल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल...