राजकारण

विधानसभेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले भास्कर जाधव; म्हणाले, हक्काची संधीसुद्धा...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

निस्सार शेख | रत्नागिरी : राज्यात सत्तांतरानंतर यंदाचे शिंदे-फडणवीसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजले आहे. सभागृहामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत आक्रमकपणे बाजू मांडत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. परंतु, अद्याप अधिवेशन संपण्यास तीन दिवस बाकी असूनही भास्कर जाधव यांनी सभागृह सोडले आहे. या अधिवेशनात जाणीवपूर्वक माझी हक्काची संधी वारंवार डावलण्यात आली, असा आरोपही त्यांनी जाताना केला आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत उपस्थित राहून कोकणासह राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडून ते सोडविण्याचा माझा प्रयत्न असतो. विधानसभा हे संसदीय लोकशाहीचं असं एक सभागृह आहे जिथे अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देता येतो व त्यासाठी माझा कायम संघर्ष असतो, हेदेखील आपण सर्वजण जाणता. उठावदार कामगिरी करून समाधानाने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांना नमस्कार करूनच मी बाहेर पडतो. ही माझी कित्येक वर्षांपासूनची प्रथा आहे. या अधिवेशनात मात्र जाणीवपूर्वक माझी हक्काची संधीसुद्धा वारंवार डावलण्यात आली. त्यामुळे अधिवेशन संपायला तीन दिवस असतानाही आज अत्यंत विषण्ण मनाने विधानभवनातून बाहेर पडावं लागलं, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...