Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar Team Lokshahi
राजकारण

राहुल गांधीवरून भातखळकरांची ठाकरे गटावर विखारी टीका; म्हणाले, मिठी मारून लायकी...

Published by : Sagar Pradhan

महाराष्ट्रात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वात भारत जोडो यात्रा सुरु आहे. परंतु, या भारत जोडो यात्रेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. या विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण भयंकर तापले आहे. या विधानामुळे भाजप आणि शिंदे गट चांगलेच आक्रमक झाले आहे. या विधानामुळे भाजप शिवसेना (ठाकरे गटावर) हल्ला चढवत आहे. त्यावरच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

काय म्हणाले भातखळकर?

राहुल गांधी यांच्या विधानावरून ठाकरे गटावर निशाणा साधताना भातखळकर म्हणाले की, राहुल गांधी यांना मिठ्या मारुन शिउबाठाने आपली लायकी दाखवलेली आहे, आता सारवासारव करून उपयोग नाही. तुमचे उरलेले आयुष्य इटालियन गांधींची धुणी भांडी करण्यातच जाणार आहे. अश्या शब्दात त्यांनी ट्विटरवरून ठाकरे गटावर टीका केली आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी सावरकरांनी अनेकवेळा इंग्रज सरकारला माफीची पत्रे लिहिली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ